'ज्ञानमेवामृताम्' ब्लॉगवर मी मारुती जगताप आपले सहर्ष स्वागत करीत आहे !!! शैक्षणिक घडामोडी :@@@ शिक्षक अभियोग्यता चाचणी 2023 निकाल जाहीर

सुविचार

 "शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.
    
                     ****************

काही मिळाले
 किंवा नाही मिळाले.......
 तो नशिबाचा खेळ आहे.....
 पण प्रयत्न इतके करा 
की परमेश्वराला देणं भागच पडेल.......


                  **************
 

चंद्र मिळवण्यासाठी नेम धरा 
                        चुकलात जरी, 
तरी एखादा तारा नक्कीच मिळेल.

                

                   ***************

   माझं कसं होईल, हा प्रश्न मला कधी पडत नाही कारण सूर्य हा बुडताना दिसतो, पण तो कधीच बुडत नाही. त्या प्रमाणे उमेद, विश्वास व कष्ट या गोष्टी ज्याच्या जवळ आहेत, तो कधीच अपयशी होऊ शकत नाही. धाडसी माणूस भीत नाही, आणि भिणारा माणूस धाडस करत नाही. जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही.
   

***************

कॅलेंडर नेहमी तारीख बदलत असते...
पण एक दिवस असा येतो की कॅलेंडरच बदलून जातं..!!
त्यामुळे संयम बाळगा, वेळ प्रत्येकाची येते...!!!

                *†**************

संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. 

जर तुम्हाला आयुष्यामधे खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशिबवान समजा.

कारण संघर्ष करण्याची संधी त्यांनाच मिळते,
 ज्यांच्यामधे क्षमता असते.


                           *****************

            

              अक्षरांच्या ओळखीसारखी
माणसांची नाती असतात.
             गिरवली तर अधिक लक्षात राहतात
 आणि वाचली तर अधिक समजतात.

                 
                    ******************

    
काय करायचे आहे
         हे ठरवणे जेवढे महत्त्वाचे आहे; 
काय करायचे नाही 
        हे ठरवणे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे.

                  
                   ************



देणारा हा नेहमी सर्वश्रेष्ठच असतो …..…
                 मग तो आधाराचा शब्द असो 
वा अडचणीच्या वेळी दिलेला 
                 मदतीचा हात.......


             *****************


सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो,
                 तर तो शब्दांनाही असतो.


                       **************


Woods are lovely,dark and deep
    But I have promises to keep
And miles to go before I sleep
    And miles to go before I sleep
                                                Charles Wordsworth

         ********************


शुन्यातून विश्व निर्माण करण्यात 
         जी मजा आहे
ती आयत्या पिठावर रेघा मारण्यात नाही.

       ******************

आयुष्यात कोणतीच गोष्ट अवघड नसते
फक्त विचार Positive पाहिजे.

       ******************


जीवनातील प्रत्येक काम असे करा की
लोक फक्त तुमची नक्कल करतील
बरोबरी नाही.


*****************


*जीवनात दहा वेळा*
      *पराभव होऊ द्या*
            *परंतु*
     *एकदाच असे जिंका की.....*
          *लोक तुम्हाला*
     *कायम लक्षात ठेवतील*

                ***********


एखाद्याच्या चेह-यावर जाऊ नये,
      कारण
प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असतो,
ज्याचे मुखपृष्ठ वेगळे
      आणि
आतील मजकूर काही वेगळाच असतो..
 
                 *************

 या धावत्या जगात चार.......
       गोष्टी कधीही बदलू शकतात....
 विचार,निर्णय.....
  माणूस आणि प्रेम....!
 एक गोष्ट कधीच बदलत नाही....
    ती म्हणजे मैत्री....!
             
  ****************

यशस्वी असण्यापेक्षा समाधानी असावं...
कारण यशाचे मोजमाप लोक करतात ,
आणि समाधानाचे मोजमाप आपलं मन करतं!!
             
   **************

सृष्टी कितीही बदलली
तरी माणूस पूर्णत: सुखी होत नाही !!
 पण दृष्टी बदलली तर
नक्कीच सुखी होतो....
           
       ***************

   "शांत व प्रसन्न मन" हे शेवटचे असे हत्यार आहे की, जे जीवनातील "कोणत्याही प्रकारच्या आव्हानांना" सामोरे जाण्यास सज्ज असते.
 
                               ******************



   माणसाने कितीही प्रयत्न केले तरी, अंधारात सावली, म्हातारपणात शरीर, आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा, कोणाचीच साथ देत नाही...!!

*****************


 .."कानाकडून" आलेल्या विचारापेक्षा..,
"मनाकडून"आलेल्या विचाराला प्राधान्य द्यावे..!!
       कठीण परिस्थितीत मनुष्याला आधाराची गरज असते सल्ल्याची नाही.

*****************

              

No comments:

Post a Comment